ही 'रोटीबँक' अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे | Lokmat Marathi News

ही 'रोटीबँक' अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे | Lokmat Marathi News

एम.आय.टी.महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रायणीच्या काठावर अनेकदा फिरण्यासाठी येत. त्यावेळी अनेक बेघर नागरिक त्यांच्या दृष्टीस पडायचे. या नागरिकांच्या समस्या पाहून विद्यार्थ्यांना नेहमीच हळहळ वाटायची. अखेर या विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून या लोकांना मदत करायची ठरवले.निवारा नसलेल्या नागरिकांच्या समस्या आपल्याकडे नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. अशा नागरिकांना मुलभूत गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कामही करत असतात. अनेकदा या संस्था प्रकाशझोतात येत नाहीत.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02

Your Page Title