एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई मोर्चा नेमका कशासाठी काढलाय?

एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई मोर्चा नेमका कशासाठी काढलाय?

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झालीय. पोलिसांचा दबाव आणून एमआयएमची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.


User: Maharashtra Times

Views: 3K

Uploaded: 2021-12-11

Duration: 07:23

Your Page Title