राज्यातील 'या' जिल्ह्यात बेड आणि ऑक्सिजनची जास्त गरज भासू लागेल | आरोग्यमंत्री

राज्यातील 'या' जिल्ह्यात बेड आणि ऑक्सिजनची जास्त गरज भासू लागेल | आरोग्यमंत्री

मुंबईतील करोना परिस्थिती गंभीर आहे. राज्यात शनिवारी नव्या करोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.


User: Maharashtra Times

Views: 56

Uploaded: 2022-01-01

Duration: 01:30

Your Page Title