"आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही,मग ते कोणीही असो"- Sanjay Raut यांचा स्पष्टीकरण |

"आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही,मग ते कोणीही असो"- Sanjay Raut यांचा स्पष्टीकरण |

शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी एकादा उमेदवार मी लढणार असे जाहीर करतो, तेव्हा त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असणार असेही ते म्हणाले.


User: HW News Marathi

Views: 17

Uploaded: 2022-05-23

Duration: 06:07

Your Page Title